सिंधुदुर्गात "जनता दरबार"द्वारे वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय; 200 हून अधिक तक्रारींवर तत्काळ निर्णय


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी आयोजित करण्यात आलेला "समाज संवाद व तक्रार निवारण मेळावा" आज जनता दरबारात रूपांतरित झाला आणि या दरबारात वंचित बहुजन समाजाचे 200 पेक्षा अधिक प्रश्न थेट पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडले गेले.

या जनता दरबारात प्रत्येक तक्रारीवर अधिकाऱ्यांसमवेत सखोल चर्चा करण्यात आली. अनेक प्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी "ऑन द स्पॉट" तोडगे काढले, तर काही प्रकरणांसाठी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांना तातडीच्या कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या. काही तक्रारी राज्य सरकारच्या पातळीवर सोडवण्याची आवश्यकता असल्याने त्या मंत्रालयस्तरावर पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले.

महत्वाच्या मागण्या व निर्णय

जनता दरबारात एक प्रमुख मागणी होती – गावातील वाड्या-वस्त्यांचे नामकरण माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावे करण्याची. या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत जिल्ह्यातील अशा सर्व वाड्यांना नाव देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

तसेच खालील विषयांवरही प्रश्न उपस्थित झाले व कार्यवाही ठरवण्यात आली:

सामाजिक वस्तीगृहांची गरज

शैक्षणिक दाखल्यांसाठी अडचणी

दलित वस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी

वैयक्तिक स्वरूपाचे निवास, उत्पन्न प्रमाणपत्र, नोकरी विषयक तक्रारी


काही निर्णय तत्काळ घेण्यात आले, तर काही गुंतागुंतीच्या बाबी पुढील सुनावणीसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्या.

हा जनता दरबार वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याच्या दिशेने एक सकारात्मक व स्तुत्य उपक्रम ठरला. जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या एकाच व्यासपीठावर ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी केल्याने समाजात विश्वास निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.